देव बोलवतोय; लेकीचा मृत्यू सहन होईना म्हणून चिमुकलीसह संपू्र्‌‍ण कुटुंबाने आयुष्य संपवले

Foto
हैदराबाद: एका कुटुंबाने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबाद येथील एका कुटुंबाने गळफास घेऊन सामुहिकपणे आपला जीव दिला. या संपूर्ण कुटुंबाने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केल्याने परपरिसरात एकच खळबळ माजली आहे. त्यांच्या मोठ्या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंब आर्थिकदृष्ट्याही अडचणीत होते. परमेश्‍वर त्यांना बोलावत आहे, या अंधश्रद्धेखाली त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

हैदराबादमधीलअंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगर येथील हे प्रकरण असल्याची माहिती आहे. श्रीनिवास, त्यांची पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी श्रव्या यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. श्रीनिवास यांच्या मोठ्या मुलीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं, ज्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. तसेच, श्रीनिवास यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्याही अडचणीत होते.

याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब काही महिन्यांपूर्वीच अंबरपेट येथे राहायला आलं होतं. यापूर्वी ते रमनगर येथे राहत होते. त्यांची मोठी मुलगी काव्याने आरोग्याच्या चिंतेमुळे आपल्या आयुष्याची अखेर केली होती. या घटनेने कुटुंब खचलं होतं. आपले जीवन संपवण्याच्या काही दिवसांपूर्वी या पती-पत्नीने शेजाऱ्यांना सांगितलं की, त्यांची मुलगी गेली आहे आणि देव आता त्यांनाही बोलावत आहे. त्यानंतर, संपूर्ण कुटुंबाने आपले आयुष्य संपवले. या कुटुंबातील एकही व्यक्ती जेव्हा दोन दिवस घराबाहेर पडलं नाही, तेव्हा श्रीनिवासचे जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी गेले. घरी पोहोचल्यावर त्यांना या तिघांचेही मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत दिसून आले.

श्रीनिवासने मुख्य प्रवेशद्वारावर गळफास घेतला होता, तर त्यांची पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगी श्रव्याने खोलीतील लोखंडी खिडकीच्या पट्ट्यांवर साडी टाकून त्यांनी गळफास घेतला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की ते त्यांच्या मोठ्या मुलीकडे जात आहेत. पोलिसांनी आता तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.